सामान्यांचे असामान्य भाऊ : ना. गुलाबभाऊ !

जळगाव -कोणतेही कार्य करायचे असल्यास ते योग्य आणि उत्तम प्रकारे केले तर त्यात तुम्ही यशस्वी होतात हे प्रत्येकाला माहिती आहे पण सर्वसामान्य माणसातून आलेला व्यक्ती जेव्हा जिद्दीने पुढे जाऊन आपले स्थान निर्माण करतो तो नक्कीच समाजासाठी उदाहरण ठरतो. असेच काहीसे व्यक्तिमत्त्व आपल्या जिल्ह्यात आज पालकमंत्री यांच्या रूपाने पाहायला मिळते आहे. खरे तर जळगावचे पालकमंत्री याहीपेक्षा प्रत्येकाचे हक्काचे गुलाबभाऊ म्हणून जास्त त्यांची आपुलकी पाहायला मिळते. माणूस कर्माने कितीही मोठा झाला तरी तो आपल्या स्वभावाने माणुसकी जपणारा राहिला तर तो नक्कीच लोकनेता असतो. हाच लोकनेता म्हणून गुलाबराव पाटील आज सर्वसामान्यांच्या सोबत चालताना, राहताना पाहायला मिळत आहे. माणसातील माणूसपण जपून त्यांनी आपले कार्य अविरत सुरू ठेवल्याने आज हा सर्वसामान्यांचा भाऊ पालकमंत्री पदावर पोहोचला आहे. पालकमंत्री हे पद खूप मोठे असले तरी आपल्या सोबतचे सामान्य लोकांना आपणच त्या पदाचे साथीदार आहोत असा विश्वास आज गुलाबभाऊंनी जपल्याने पद, भाऊ आणि जनता यांच्या कोणत्याही प्रकारचा भेदभाव झाल्याचे पाहायला मिळत नाही. म्हणूनच सामान्य प्रत्येक माणसाशी आपला माणूस म्हणून गुलाबभाऊंची आज ओळख निर्माण झाली आहे. त्यांच्या बोलण्यातील शैली कणखर असली तरी माणूस म्हणून प्रत्येकाशी त्यांचा स्वभाव हा मवाळ आहे. भाऊंना वाढदिवसाच्या पुनश्च हार्दिक शुभेच्छा!
आदरणीय ना. गुलाबभाऊ पाटील हे कर्तृत्व शिखराचे मेरुमणी होत ! ‘भाऊ’ शब्द खान्देशात कोणीही उच्चारला तर सर्वप्रथम ऐकणाऱ्याच्या डोळ्यासमोर ना. गुलाबभाऊंचीच प्रतिमा उभी राहते. खान्देशाच्या मातीत गुलाबभाऊ हे प्रत्येकाच्या अंतकरणात ‘भाऊ’ म्हणूनच स्थित आहेत. गुलाबभाऊंचं असणार इतकं अतूट समीकरण या शब्दाशी जोडले आहे किंबहुना या शब्दाला एक वेगळा आयाम गुलाब भाऊंमुळेच प्राप्त झाला आहे.
गिरणामाईच्या कुशीत वसलेल्या छोट्याशा बोरखेडा गावात भाऊंचा जन्म झाला. घरी १८ विश्व दारिद्र्य, वडील गावात शेती करत चार-पाच भाऊ बहिणींचे मोठे कुटुंब. त्यामुळे शालेय शिक्षण पूर्ण करून कुटुंबाला हातभार लावण्यासाठी भाऊंनी पानटपरी चालवली. तिथे येणाऱ्या सर्व स्तरीय सर्वपक्षीय कार्यकर्त्यांशी गप्पा होत असतानाच त्यांच्यात धडाडीच्या निडर नेत्याचे बीजारोपण झाले.
एखादी श्रद्धावान भाविकाच्या भूमिकेत बसून कथा कीर्तन ऐकतात. सामान्यातल्या सामान्य कार्यकर्त्यांकडे विवाह तसेच सुख-दुःखाच्याप्रसंगी भाऊंची भेट ठरलेली असते. आजारी कार्यकर्त्यांची आस्थेवाईकपणे विचारपूस करून उपचारासाठी पदरमोड करतात. त्यांच्याच पुढाकाराने जिल्ह्यातील वारकऱ्यांच्या एकत्रीकरणाला गती मिळाली आहे. ना. गुलाबभाऊ असे सामान्यांचे असामान्य भाऊ आहेत त्यांच्या यशाचा हा आलेख उत्तरोत्तर वाढत राहो, भाऊंना उदंड निरोगी दीर्घ आयुष्य लाभो व त्यांच्या हातून जनता जनार्दनाची सेवा घडो ! ही सदिच्छा व्यक्त करतो. भाऊंच्या वाढदिवसानिमित्त भाऊंना खूप खूप शुभेच्छा देतो…!!









