माणुसकीचा झरा… जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांनी ऊसतोड मजुराच्या चिमुकल्यांना घातले बुट!

जळगाव – प्रशासन म्हणजे केवळ आदेश देण्याचं यंत्र नव्हे, तर जनतेच्या सुखदुःखात सहभागी होणारी एक संवेदनशील यंत्रणा असावी, याचा प्रत्यय जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या एका लहानशा पण हृदयस्पर्शी कृतीतून आला.
जिल्हाधिकारी कार्यालयात ऊसतोड मजुरी करणाऱ्या कुटुंबासोबत आलेल्या दोन ते तीन चिमुकल्यांच्या पायात चप्पल नव्हती. एप्रिलच्या रणरणत्या उन्हात हे लहानगे अनवाणी पायाने भटकताना पाहून जिल्हाधिकारी स्वतः हेलावले. आपल्या आरामदायक दालनात बसून केवळ पाहणं हे त्यांनी निवडलं नाही, तर संवेदनशीलतेचा जिवंत प्रत्यय देत त्यांनी क्षणाचाही विलंब न करता बुट मागवले.
ते बुट त्यांनी स्वतःच्या हाताने त्या मुलांच्या पायात घातले. हा प्रसंग पाहणाऱ्यांच्या डोळ्यांत पाणी आले. लोकसेवा म्हणजे हृदयात माणुसकी असणं, हे त्यांनी कृतीतून दाखवून दिलं.
त्यांच्या या भावनिक आणि मानवी मूल्यांनी ओतप्रोत कृतीमुळे जिल्हा प्रशासनाचं मानवी चेहरा अधोरेखित झाला आहे. जळगाव जिल्ह्यातील नागरिकांचं मन या संवेदनशील अधिकाऱ्यांनी जिंकलं आहे, हे नक्की.
धन्य ती संवेदना, धन्य ती माणुसकी…!