बातम्या
शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक निर्णय! महाराष्ट्र सरकारने ४,८४९ एकर जमीन परत केली

महाराष्ट्र सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकारने ४,८४९ एकर जमीन शेतकऱ्यांना परत करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे अनेक शेतकऱ्यांना त्यांच्या हरवलेल्या जमिनी परत मिळणार असून, त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. याआधी या जमिनी सरकारकडे जमा झाल्या होत्या, परंतु आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत त्या शेतकऱ्यांना परत देण्याचा निर्णय झाला.