बातम्या
शासनाचे लक्ष वेधण्यासाठी 9 रोजी ग्रामपंचायतीत काम बंद आंदोलन

प्रतिनिधी – बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या अमानवीय हत्येनंतर महाराष्ट्रातील समाजमन हेलावले आहे.या महाभयानक हत्येमुळे राज्यातील सरपंच उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य भयभीत झालेले आहेत.अनेक गावात ग्रामपंचायत कारभार करताना गावकारभारी दबावाखाली असतात.सरपंच व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी शासनाने कायदा करून ठोस उपाययोजना कराव्यात म्हणून राज्यातील ग्रामपंचायती एक दिवसीय काम बंद आंदोलन करणार आहेत,असे पंचायत राज मंच संचालित अखिल भारतीय सरपंच परिषदेने जाहीर केले आहे.