सीमेवर वाहनधारकांना त्रास – रक्षाताईंच्या पुढाकाराने उच्चस्तरीय बैठक

यावल, दि. २ (जिल्हा प्रतिनिधी – हमीद तडवी) महाराष्ट्रातून मध्यप्रदेशकडे जाणाऱ्या नागरिकांना आणि वाहनधारकांना सीमावर्ती भागात मध्यप्रदेश पोलिसांकडून सातत्याने त्रास दिला जात असल्याच्या तक्रारी गेल्या काही दिवसांपासून समोर येत होत्या. विशेषतः जळगाव जिल्ह्यातून बुऱ्हाणपूरकडे जाणाऱ्या दुचाकी व चारचाकी वाहनांची अडवणूक करून वाहनचालक व प्रवाशांना विनाकारण थांबवणे, चौकशीच्या नावाखाली त्रास देणे अशा स्वरूपाच्या घटना घडत असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांच्याकडे आली होती.
“मंत्री गुलाबराव पाटील यांचा वाढदिवस विशेष : शुभेच्छा जाहिराती पाहा”
या तक्रारींची गंभीर दखल घेत रक्षाताई खडसे यांनी बुऱ्हाणपूर जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. या बैठकीस बुऱ्हाणपूरच्या आमदार श्रीमती अर्चनादिदी चिटणीस, बुऱ्हाणपूरचे पोलिस अधीक्षक देवेन पाटीदार, उपजिल्हाधिकारी वीरसिंग तसेच परिवहन व सीमा सुरक्षा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
यावल, पारोळा, पाचोरा, वरणगाव आदी ठिकाणच्या पोलीस ठाण्यांमध्ये नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
पोलीस दलात मोठा फेरबदल! कोण कोठे गेले, पाहा संपूर्ण यादी बघण्यासाठी इथे क्लिक करा 👈
या बैठकीत केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांनी महाराष्ट्रातून बुऱ्हाणपूरकडे येणाऱ्या वाहनधारक व प्रवाश्यांना होणाऱ्या त्रासावर चिंता व्यक्त करत, याबाबत त्वरित सुधारणा करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. नागरिकांना विनाकारण त्रास होणार नाही याची काळजी घेण्याचे निर्देश त्यांनी दिले.बैठकीत उपस्थित प्रशासन व पोलिस अधिकाऱ्यांनी याबाबत सकारात्मक प्रतिसाद देत, लवकरच योग्य ती कार्यवाही केली जाईल आणि सीमावर्ती अडवणुकीचे प्रकार थांबवले जातील, असे आश्वासन दिले.रक्षाताईंच्या पुढाकारामुळे अनेक वाहनधारक व प्रवाशांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. सीमावर्ती भागातील नागरिकांच्या प्रश्नावर थेट केंद्रीय मंत्र्यांनी लक्ष घालणे हे निश्चितच कौतुकास्पद आहे.