बातम्या

तेली समाजाला न्याय देण्याची हीच ती वेळ ..,जळगावमध्ये झळ कले बॅनर …

राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असताना जळगावात राजकीय घडामोडीना चांगलाच वेग आला आहे . या निवडणुकीनंतर विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी तयारी सुरु झाली असून या पार्श्वभूमीवर आता भाजप प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांचे बॅनर जळगावात झळकले आहे .”अबकी बार विजय भाऊ आमदार .. , तेली समाजाला न्याय देण्याची हीच ती वेळ… असे आशयाचा मजकूर असलेले बॅनर सध्या जळगाव जिल्हावासियांचे लक्ष वेधून घेत आहे. लवकरच विजय चौधरी यांची वर्णी विधान परिषदेवर लागावी अशी मागणी तेली समाजाच्या वतीने करण्यात आली आहे.

दरम्यान तेली समाजाकडून करण्यात आलेल्या मागणीनुसार राज्यपाल नियुक्त विधान परिषदेच्या आमदारकीवर विजय चौधरी यांना भाजपने संधी द्यावी तसेच तेली समाजातील एका सक्रिय नेत्याला विधान परिषदेत पाठवावे असे बॅनर जळगाव शहरातील आकाशवाणी चौकात झळकत आहे. तेली समाजा मध्ये राज्यभर सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या विजय चौधरी यांची राज्यपाल नियुक्त विधान परिषदेवर आमदारकीसाठी संधी द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे.

विजय चौधरी हे गेल्या अनेक वर्षांपासून भाजपमध्ये सक्रिय होते , नंदुरबार जिल्ह्याचे भाजप जिल्हाध्यक्ष ते भाजपा प्रदेश महामंत्री पर्यंतचा प्रवास त्यांचा संघर्षमय आहे. तेली महासंघाच्या माध्यमातून राज्यभरात तेली समाजाच्या संघटनात्मक उभारणे तसेच असणाऱ्या समस्या यासाठी नेहमी पुढाकार घेत आवाज उठवण्याचा प्रयत्न केला आहे. मोठया प्रमाणात ओबीसी समाजासाठी सामाजिक कार्य त्यांच्या जमेच्या बाजू आहेत.

दरम्यान या आधी भारतीय जनता पार्टीचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी केलेल्या व्यापक कार्याची दखल घेऊन केंद्रीय नेतृत्वाने संमती दिल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश महामंत्रीपदी देखील विजय चौधरी यांची निवड केली होती. महामंत्रीपदी लागल्यानंतर राज्यभरात विजय चौधरी यांनी लोकसभेच्या दृष्टिकोनातून संघटनात्मक कार्यासाठी स्वतःला वाहून घेतले. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वात विजय चौधरी यांचे पक्ष वाढीसाठी अहोरात्र कार्य सुरू आहे.

भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना बळ देण्याचा काम विजय चौधरी यांच्या माध्यमातून करण्यात आले आहे. संघटनात्मक बाबींवर कटाक्षाने सुसूत्रता आणण्यात विजय चौधरी यांनी अधिक महिन्यात घेतली आहे. नंदुरबार सारख्या आदिवासी भागात भारतीय जनता पार्टीचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी विजय चौधरी सातत्यपूर्ण प्रयत्न करताना दिसून येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!