राजकारणात नातं जपणारा नेता – प्रतापरावांची कहाणी प्रेरणादायी आहे!

जळगाव प्रतिनिधी |आजच्या राजकारणात जर कोणाकडे आशेने पाहायचं असेल, तर तो चेहरा म्हणजे प्रतापराव गुलाबराव पाटील. जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याच मार्गदर्शनाखाली, त्यांच्या विचारांचा वारसा चालवत, जनतेच्या हक्कासाठी झटणारे, युवकांचे प्रेरणास्थान म्हणून प्रतापराव पाटील यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे.
प्रथमच जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आलेल्या प्रतापराव यांनी सत्तेचा गजर न करता, राजकीय आकस बाजूला ठेवत, सर्वसामान्य माणसाचे प्रश्न निस्वार्थ भावनेने सोडवले. कोणत्याही जाती, धर्म, पक्ष न पाहता त्यांच्या दारात आलेल्या प्रत्येकासाठी उपलब्ध राहणं हीच त्यांची खरी ओळख बनली आहे. जनतेशी जोडलेले राहणं आणि प्रत्येकाशी आपलेपणाने वागणं, ही त्यांच्या कार्यशैलीची खरी ताकद आहे.
जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्यांनी केलेल्या कामापेक्षा अधिक समाज उपयोगी कामं त्यांनी नंतरच्या काळात केली. सामाजिक, धार्मिक आणि वैद्यकीय क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे:
- गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, पंढरपूर वारी, कीर्तन सोहळे यांत सक्रिय सहभाग
- पनवेल येथील रुग्णालयात मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया, GPS मित्र परिवाराच्या सहकार्याने
- दीपकराव सावळे यांच्यासारख्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून गरजूंना तात्काळ रेशन कार्ड, शासन योजना आणि आरोग्य सुविधा मिळवून देणे
- सरकारी दवाखान्यांमध्ये योग्य सुविधा उपलब्ध करून देणे
- वृद्ध, निराधारांचे पगार वेळेवर सुरू करून घेणे
अशा कितीतरी छोट्या-मोठ्या कामांमधून त्यांनी जनतेचं मन जिंकून घेतलं आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील अधिवेशनाच्या कामात व्यस्त असताना, प्रतापराव व त्यांचे भाऊ विक्की बाबा यांनी मतदारसंघात त्यांची अनुपस्थिती जाणवू दिली नाही. कोणताही गाजावाजा न करता, प्रत्येक कार्यात प्रत्यक्ष सहभागी होणं, हीच त्यांची विशेषता आहे.
या संदर्भात GPS मित्र परिवाराचे सक्रिय कार्यकर्ते दीपकराव सावळे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले,
“प्रतापराव पाटील यांच्यासारखं संवेदनशील आणि नेहमी सर्वसामान्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणारं नेतृत्व दुर्मिळ आहे. त्यांनी जिल्हा परिषद सदस्य म्हणून असताना जितकं काम केलं, त्याहीपेक्षा नंतर अधिक प्रभावीपणे जनतेसाठी झटल्याचं आम्ही जवळून पाहिलं आहे. त्यामुळेच आम्ही ‘We Want Z.P. प्रतापराव पाटील’ असा आवाज पुन्हा पुन्हा बुलंद करतो.”
आज प्रत्येक सामान्य माणूस, कार्यकर्ता एकच आवाज उठवतोय –
“We Want Z.P. प्रतापराव पाटील”
ते पुन्हा जिल्हा परिषदेत निवडून यावे, ही केवळ आमची इच्छा नाही, तर हा जनतेचा आवाज आहे.
– दीपकराव सावळे यांच्यासह स्थानिक कार्यकर्त्यांच्या भावना