बातम्या

जळगावात पावसाचा धुमाकूळ ; पिकांना फटका, शेतीचे प्रचंड नुकसान

जळगाव,(प्रतिनिधी)- खान्देशात ११० टक्क्यांवर पाऊस झाला असून जळगावात पावसाने धुमाकूळ घातल्याने काढणी, मळणीवर आलेल्या पिकांना मोठा फटका बसत आहे.धानवड चिंचीली उमाळा परिसरात मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे केळी आणि कापूस पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. दरम्यान धानवड चिंचोली उमाळा परिसरातील शेतकरी शिवराज रावसाहेब पाटील यांच्या शेतातील 1हजार केळीचे झाडे कोलमडून पडल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे,हातातोंडाशी आलेला घास हिरावल्याने शेतकरी अडचणीत आले आहेतयंदा सप्टेंबरच्या मध्यातच खानदेशात पावसाने एकूण सरासरीची टक्केवारी ओलांडली आहे. जळगाव, धुळे व नंदुरबारात ११० टक्क्यांवर पाऊस झाला आहे. जळगाव जिल्ह्यातील पाऊस ११२ टक्के एवढा आहे.जळगावचे एकूण पाऊसमान ६३२ मिलिमीटर, धुळ्याचे ५३५ मिलिमीटर तर नंदुरबारचे पाऊसमान ८६२ मिलिमीटर आहे. या सर्वजिल्ह्यांत पावसाने सरासरी ओलांडली आहे. जळगाव जिल्ह्यात ऑगस्टअखेरीस १०० टक्के पाऊस झाला आहे. तर या महिन्यात काही दिवस पावसाची उघडीप होती. मागील तीन-चार दिवसांपासून खानदेशात हलका ते मध्यम पाऊस येत आहे. सोमवारी (ता. २३) जळगावसह धुळे, नंदुरबारमध्येही पाऊस झाला. जळगाव जिल्ह्यातील जळगाव, चोपडा, धरणगाव, एरंडोल, जामनेर आदी भागात पाऊस झाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!