ऑपरेशन सिंदूरच्या यशस्वीतेनंतर शिवसेनेचा आनंदोत्सव, पेढे वाटून साजरा केला विजय

जळगाव – भारताने दहशतवादाविरोधात मोठी आणि निर्णायक कारवाई करत पाकिस्तानमधील ९ दहशतवादी ठिकाणे उद्ध्वस्त केली. या कारवाईस ‘ऑपरेशन सिंदूर’ असे कोडनेम देण्यात आले असून, भारतीय सैन्याने अत्यंत शौर्याने आणि नियोजनपूर्वक ही कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली.
या ऐतिहासिक आणि दहशदवादविरोधी निर्णायक कारवाईच्या पार्श्वभूमीवर शिवसेना जळगाव जिल्हा यांच्यातर्फे शिवसेना कार्यालय, पाडे चौक, जळगाव येथे पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. भारतीय सैन्याच्या या कामगिरीबद्दल गौरव व्यक्त करत शिवसैनिकांनी जल्लोषात सहभाग घेतला.
या कार्यक्रमाला शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णु भंगाळे, उत्तर महाराष्ट्र महिला समन्वयक सरिताताई माळी-कोल्हे, महानगरप्रमुख संतोष पाटील, शहर प्रमुख गणेश सोनवणे, किशोर भोसले, उप जिल्हाप्रमुख स्वप्नील परदेशी, तालुका प्रमुख शिवराज पाटील, हर्षल मावळे, प्रविण कोल्हे, चेतन सनकत, जितेंद्र गवळी, शोभाताई चौधरी, ममता जंजाळ, रजना सपकाळे, भारती म्हस्के, प्रतीभा घोडेस्वार, अनिता कापुरे, शारदा सुरळके, प्रतीभा शिंदे, ॲड.अभिजीत रंधे, राहुल नेतलेकर, सोहम विसपुते, रोशन साळुखे, आदिल झोपे, वैभव सोनवणे, सचिन सोनार, सागर हिवराळे, यश सोनवणे, भावेश ढाके, विशाल निकम, राजेश काळे, दीपक पाटील, दिनेश जगताप, केतन पोळ, विजय लाड, शुभम निकम, अमोल मोरे, नेमीचंद येवले यांच्यासह अनेक शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिवसैनिकांनी ‘जय हिंद’, ‘भारतीय सैन्याचा विजय असो’, ‘दहशतवादाचा नाश होवो’ अशा घोषणांनी परिसर दणाणून टाकला. उपस्थितांनी ऑपरेशन सिंदूरबाबत अभिमान व्यक्त करत भारतीय सैन्याच्या धाडसी कारवाईस सलाम केला.
या कार्यक्रमाचे संयोजन शिवसेना जळगाव महानगरच्या वतीने करण्यात आले होते. शिवसेनेच्या वतीने भारतीय जवानांच्या पराक्रमाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली आणि भविष्यात देशाच्या सुरक्षेसाठी शिवसेना नेहमी अग्रस्थानी राहील, असा निर्धारही करण्यात आला.