जळगाव जिल्ह्यातील अतिदृष्टीमुळे ओला दुष्काळ जाहीर करणे बाबत

जळगाव जिल्ह्यातील अतिदृष्टीमुळे ओला दुष्काळ जाहीर करणे बाबत वरील विषयास अनुसरून आम्ही आपले निदर्शनात आणून देऊ इच्छितो की गेले तीन महिन्यापासून सततच्या पावसामुळे अतिवृष्टी मुळे लागवड झालेले सर्वच पिकांचे तसेच काही हाती आलेल्या हंगामाचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे आणि त्या अनुषंगाने शेतकरी हवालदिल झालेला आहे शेतकऱ्यांनी कर्ज काढून लागवड केली फवारणी केली खते टाकली परंतु सततच्या पावसामुळे शेतकरी खूप मोठ्या आर्थिक संकटात सापडलेला आहे हे शेतकऱ्यावरचे संकट सरकारने दूर करावे व लवकरात लवकर आपल्या स्तरावर पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश देऊन जळगाव जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा ही विनंती निवेदन स्वीकारताना निवासी जिल्हाधिकारी तसेच निवेदन देतेवेळी जिल्हाध्यक्ष मुकुंदा रोटे, शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील, उप महानगराध्यक्ष आशिष सपकाळे, जनहित चे श्रीकृष्ण मेंगळे, तालुकाध्यक्ष हेमंत कोळी, उपतालुकाध्यक्ष प्रशांत बारी, तालुका सचिव अनिल दिघे,, शेतकरी सेनेचे तालुका अध्यक्ष प्रदीप पाटील, संदीप मांडोळे, विलास सोनार, गोरख काटोले, ऋषिकेशअस्वार, पवन बारी ,हेमंत काटोले, अशितोष जाधव, रोहित माळी, धनंजय चौधरी, दिलीप मिस्तरी, आदी महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते