बातम्या

गाडीतून सापडला २४ लाखांचा गांजा – पोलिसांचा छापा

चाळीसगाव : येथील शहर पोलीस स्टेशनच्या पथकाने मोठी कारवाई करत ४२ किलो ५८३ ग्रॅम वजनाचा गांजा वाहतूक करत असलेल्या इसमाला अटक केली आहे. आरोपीच्या ताब्यातून तब्बल २४ लाख ६९ हजार १५० रुपयांचा अंमली पदार्थ व वाहन जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई चाळीसगाव शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत करण्यात आली.

ही घटना ३० एप्रिल २०२५ रोजी रात्री १२.०० वाजेच्या सुमारास घडली. पोलीस निरीक्षक किरणकुमार दशरथ कवाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उप.नि. संदीप घुले व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.

या कारवाईत एकूण २४,६९,१५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, आरोपीविरोधात एनडीपीएस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादीच्या तक्रारीनुसार, आरोपी शेख नदीम शेख चशीर शेख, वय ४० वर्षे, रा. मालदा फाटा, गुसने खालसा गल्ली नं. ३, मालेगाव, जि. नाशिक हा त्याच्या ताब्यातील पांढऱ्या रंगाची मारुती कंपनीची स्विफ्ट डिझायर कार (क्रमांक MH 12 KN 2305) मध्ये गांजा वाहतूक करत असताना सापडला.

या कारमधून ४ निळ्या प्लास्टिकच्या पिशव्या सापडल्या. त्यामध्ये वेगवेगळ्या वजनाचे एकूण ४२ किलो ५८३ ग्रॅम वजनाचे गांजाचे गठ्ठे आढळले. त्यांची किंमत खालीलप्रमाणे आहे:

1. पिशवी क्र. 1 – ९ किलो ५९२ ग्रॅम गांजा, किंमत अंदाजे ₹ ४,७९,६००/-

2. पिशवी क्र. 2 – ९ किलो ८८० ग्रॅम गांजा, किंमत अंदाजे ₹ ४,९४,०००/-

3. पिशवी क्र. 3 – १० किलो ५३० ग्रॅम गांजा, किंमत अंदाजे ₹ ५,२६,५००/-

4. पिशवी क्र. 4 – १२ किलो ५८१ ग्रॅम गांजा, किंमत अंदाजे ₹ ६,२९,०५०/-

5. वाहन – मारुती स्विफ्ट डिझायर (MH 12 KN 2305), किंमत अंदाजे ₹ ४,००,०००/-

एकूण जप्त मुद्देमालाची किंमत अंदाजे ₹ २४,६९,१५०/- इतकी आहे.

अटक आरोपीचे नाव:

शेख नदीम शेख चशीर शेख (वय ४०), रा. मालदा फाटा, गुसने खालसा गल्ली नं. ३, मालेगाव, जिल्हा नाशिक.

गुन्हा दाखल कलमे:

NDPS Act 1985 चे कलम ८ (C), २० (B), प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस अधिकाऱ्यांची माहिती:

  • पोलीस निरीक्षक – किरणकुमार दशरथ कवाडी
  • तपास अधिकारी – पो.उप.नि. संदीप घुले

या घटनेचा पुढील तपास सुरू असून, आरोपीला न्यायालयात हजर केले असता ३ मे २०२५ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

गांजाचा एवढा मोठा साठा जळगाव जिल्ह्यात येत होता हे अत्यंत गंभीर बाब आहे. पोलिसांनी केवळ आरोपींना पकडून थांबू नये, तर हे गांजाचे जाळे जिल्ह्यात किती खोलवर पोहोचले आहे याची सखोल चौकशी करणे आवश्यक आहे. 42 किलो गांजा पकडण्यात आला आहे, पण हा पहिलाच प्रसंग नाही  याआधीही अशा प्रकारचा अवैध व्यापार जिल्ह्यात झालेला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. पोलिस अधीक्षकांनी या प्रकरणात गांभीर्याने लक्ष घालून जिल्ह्यात अजून कुठे अशा प्रकारचा गांजा लपवून ठेवण्यात आला आहे का, हे शोधून काढावे. तसेच, यामागे असलेली मोठी टोळी व तिचे नेटवर्क उद्ध्वस्त करण्यासाठी कडक कारवाई करावी.जिल्ह्यात कुठे साठवणूक होते – याची सखोल चौकशी करणे अत्यावश्यक आहे. पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणात स्वतः लक्ष घालून जळगाव जिल्ह्यात गांजाच्या अवैध साठ्यांवर मोठी मोहीम राबवावी.

चाळीसगावमध्ये पकडलेला ४२ किलो गांजाचा साठा ही सामान्य घटना नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणात गांजा जर जिल्ह्यात येत असेल तर हे केवळ वाहतुकीचे प्रकरण नसून संपूर्ण जिल्ह्यात नशेचं मोठं रॅकेट कार्यरत आहे, असा स्पष्ट संशय व्यक्त होतो. याआधीही अशा घटना घडल्या असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

जिल्ह्याच्या सुरक्षिततेसाठी, युवकांच्या भवितव्यासाठी आणि कायदा-सुव्यवस्थेसाठी पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणात स्वतः लक्ष घालून:

गांजाची मागणी कुठून येते?

मागवणारे कोण?

जिल्ह्यात कुठे साठवणूक होते?

पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात कोणत्या भागात संशयास्पद हालचाली आहेत?

 

या प्रत्येक बाबींची सखोल चौकशी करून मोठी शोध मोहीम हाती घ्यावी. हा गांजाचा साठा कुठे जात होता, हे शोधून त्यामागील मास्टरमाइंडना अटक करणे अत्यावश्यक झाले आहे.

अशी वेळ आली आहे की या प्रकरणात पोलीस विभागाने “Operation Clean Jalgaon” सारखी विशेष कारवाई सुरू करावी.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!