मंत्री गुलाबराव पाटील यांना जळगाव जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची हॅट्रिक !

जळगाव जिल्ह्याच्या विकासाचा चेहरा बदलणारे, जनसामान्यांच्या समस्या सोडवण्यासाठी सदैव तत्पर राहणारे आणि प्रशासन व राजकारणात उत्तम समन्वय साधणारे आपल्या प्रिय नेते मंत्री गुलाबराव पाटील साहेब यांना तिसऱ्यांदा (हॅट्रिक) जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून बहाल केल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन !
मंत्री गुलाबराव पाटील यांनी डीपीडीसीच्या माध्यमातून जिल्ह्यातील विकासाला नवीन उंचीवर नेऊन, दोन वेळा 100% निधीच्या प्रभावी खर्चाचे यशस्वी उदाहरण प्रस्थापित केले आहे. त्यांच्या कुशल नेतृत्वाखाली अतिशय सूक्ष्म नियोजन, सर्वपक्षीय आमदारांशी सौहार्दपूर्ण संबंध, अधिकाऱ्यांना स्वातंत्र्य व प्रोत्साहन देऊन काम करण्याची संधी आणि जनहिताचे उपक्रम राबवण्याचा त्यांचा दृष्टिकोन आदर्शवत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडून पुन्हा एकदा जळगाव जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात येणे हे त्यांच्या नेतृत्वगुणांचे आणि कार्यक्षमतेचे प्रतीक आहे.
गेल्या काही वर्षांत जिल्ह्यात विविध क्षेत्रांमध्ये त्यांनी केलेल्या कामाचा ठसा अविस्मरणीय आहे. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी उभारलेला प्रयत्न निश्चितच अनुकरणीय आहे.
तिसऱ्यांदा पालकमंत्री होण्याच्या या सन्मानामुळे जळगाव जिल्ह्याच्या जनतेचे आत्मविश्वास आणि आशा अधिक बळकट झाल्या आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्याचा विकास आणखी वेगाने होईल, अशी आम्हाला खात्री आहे.
“जळगाव जिल्ह्याच्या हितासाठी अहोरात्र झटणाऱ्या आपल्या लाडक्या नेत्याचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा !”*