तापी परिसराला वरदान ठरणाऱ्या शेळगाव बॅरेज धरणाचे आमदार शिरीष दादा चौधरी यांच्या हस्ते जलपूजन

लोकसेवक स्व. मधुकरराव चौधरी यांनी मुख्यत्वे पाणी व शिक्षण यासाठी कार्य केले.जिल्ह्यातील हतनूर धरणाचे ते शिल्पकारअसून यावल-रावेर परिसासाठी केवळ हतनूर पुरेसे नाही याची जाण असल्यामुळेच त्यांनी गारबडीं (सुकी), मोर, अभोडा, बोरी, भोकरबारी, बहुळा, गंगापूरी, लोहारा, मंगरुळ, सूट, काळाडोह, तोंडापूर, मात्रण आदी प्रकल्प उभारलेत. त्यांच्या या दूरदर्शीपणामुळेच परिसरात बागायती फुलली.इतकेच काय तर वाचूर धरणाची मुहूर्त मेढही त्यांनीच टोवली. याशिवाय स्व.लोकसेवक मधुकरराव चौधरी यांच्या काळात अनेक महाविद्यालये, गावोगावी हायस्कुल, शाळांची निर्मिती झाली.परिणामी परिसरातील पिढ्या नं पिढ्या शिक्षीत झाल्या.बागायतीतून आलेली सुबत्ता अन् शिक्षणाची झालेली व्यवस्था, त्यातून आलेली समृद्धी यामुळेच जगाच्या कान्याकोपऱ्यात आपले युवक जाऊन पोहचले.आज पाणी हा महत्त्वाचा मुद्दा असून प्रत्येकाने पाण्याचा सन्मान केला पाहिजे व पाण्याचा वापर हा काटकसरीने केला पाहिजे.’जल है तो कल है’ या उक्तीप्रमाणे आज शेळगाव बॅरेज येथे जलपूजनाचा कार्यक्रम माझ्या हस्ते व नाशिक पदवीधर मतदारसंघाचे माजी आमदार सुधिरजी तांबे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.यावेळी सोबत मा.डॉ. सुधीरजी ताबे साहेब,माजी आमदार,मा.आ. रमेशदादा चौधरी,मा श्रीरामदादा पाटील ,मा.प्रभाकर अप्पा सोनवणे मा.लिलाधरशेठ चाधरी मा.अतुलदादा पाटील मा प्रकाशदादा पाटील इंजीनिअर,मा.जनाबाई गोंडू महाजन मा शेखरदादा पाटील -मा. किशोरदादा पाटील,मा.प्रल्हादभाऊ बोडे मा.जगदीश कवडीवाले,मा.अनिलदादा महाजन,मा.चंद्रकलाताई इंगळे,मा.प्रभाकरदादा झोपे,मा शरददादा कोठी,मा.डॉ.सुरेश पाटील,मा डॉ.राजेंद्र पाटील,मा मुकेश येवले सर,मा. हरिशशेठ गणवाणीश्री गोंडूभाऊ महाजन श्री आत्माराम शंकोपाळ,मा संतिषआबा पाटील,मा. हयात शेठ,मा. जावेद जनाब यांची उपस्थिती होती.