राजकारण

Vidhan Sabha : खासदार झाल्यानंतर विधानसभेतील 2 आमदारांचे राजीनामे, आणखी 5 आमदार राजीनामा देणार

मुंबई : लोकसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातून निवडून आलेले 48खासदार आता दिल्ली दरबारी आपला आवाज बुलंद करणार आहेत.18 व्या लोकसभा निवडणुकीत मराष्ट्रातील 48 पैकी 30 जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आले आहेत.

तर, महायुतीचे17 उमेदवार विजयी झाले आहे. सांगलीतून अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी विजय मिळवला असून काँग्रेसला (Congress) आपला पाठिंबाही जाहीर केला आहे. त्यामुळे, आता नवनिर्वाचित 48 खासदार संसदेत जाणार आहेत. मात्र, या 48 खासदारांमध्ये 7विद्यमान आमदार (MLA) आहेत. त्यामुळे, या सर्वचआमदारांना राजीनामा (Resigne) द्यावा लागणार आहे. त्यापैकी, 2 विधानसभा आमदारांनी विधानसभा अध्यक्षांकडे आपला राजीनामा दिला आहे.

राज्यातील विधानसभा निवडणुकांची घोषणा पुढील 4 ते 5 महिन्यात होणार आहे. त्यामुळे, सर्वांनाच विधानसभा निवडणुकांचे वेध लागले असून लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राजकीय पक्षांचा फोकस विधानसभेकडे आहे. त्यातच, नवनिर्वाचित खासदार बनलेल्या आमदारांनी आता आपला राजीनामा देण्यास सुरुवात केली आहे. दोन विधानसभा आमदारांनी पदाचा राजीनामा दिला असून आणखी 4 आमदार राजीनामा देणार असल्याची माहिती आहे. राज्यातील 7 विद्यमान आमदारांना खासदार झाल्यामुळे 20 जूनपर्यंत आपल्या आमदारकीचा राजीनामा द्यावा लागणार आहे. त्यामुळे, आत्तापर्यंत काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे व बळवंत वानखेडे यांनी विधानसभा अध्यक्षांकडे आपला राजीनामा दिला आहे. अद्याप आमदार रविंद्र वायकर, वर्षा गायकवाड, प्रतिभा धानोरकर व मंत्री संदीपान भुमरे यांच्या राजीनाम्याची प्रतीक्षा आहे. त्यामुळे, हे उर्वरीत 5 आमदारही लवकरच राजीनामा देतील, असे दिसून येते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!