ऑक्टोबर महिना ठरणार सर्वात धोकादायक 115% जास्त पाऊस! IMD चा अंदाज ऐकून शेतकऱ्यांची झोप उडाली
आता ऑक्टोबरमध्ये नवं संकट येणार, हवामान खात्याच्या अंदाजाने खळबळ; शेतकऱ्यांची चिंता वाढली!

जळगाव श्री मराठी न्युज । । गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रासह देशांतील विविध राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांचे हाल झाले आहेत. मात्र संकट अजूनही टळलेले नाही. ऑक्टोबर महिना आणखी आव्हानात्मक ठरणार आहे.
हवामान विभागाने ऑक्टोबरमध्ये संपूर्ण भारतात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. पुढील महिन्यात सामान्य पातळीपेक्षा तब्बल 115% जास्त पाऊस पडणार असल्याची माहिती आयएमडीचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी दिली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
ऑक्टोबरमध्ये सरासरीच्या 115% पावसाची शक्यता
मृत्युंजय महापात्रा यांनी पुढील ऑक्टोबर महिन्यातील पावसाच्या अंदाजाबाबत भाष्य केले आहे. त्यांनी म्हटले की, सप्टेंबरमध्ये सामान्यपेक्षा जास्त पाऊस पडला. आता ऑक्टोबरमध्ये गेल्या 50 वर्षांच्या सरासरीच्या 115% पेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे.
यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. सप्टेंबरमधील पावसामुळे शेतमालाचे मोठे नुकसान झाले आहे. अनेकांची पिके पाण्याखाली गेली आहेत. शेतकरी अडचणीत असताना आता त्यांच्यासमोर नवं संकट उभे ठाकले आहे.
मान्सून लांबला, संकट वाढले
भारतात पावसाळा सप्टेंबर अखेरपर्यंत संपतो. मात्र यंदा मान्सून मागे हटलेला नाही. देशाच्या काही भागात अजूनही मुसळधार पाऊस कोसळत आहे. आता ऑक्टोबरमध्येही मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता दुपटीने वाढली आहे.
ज्या शेतकऱ्यांची पिके अजून वाचलेली आहेत, त्यांना आता नव्या धोक्याचा सामना करावा लागणार आहे.
जास्त पाऊस पडण्यामागची कारणे
दरवर्षी बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रातून येणारे दमट वारे उत्तरेकडे आणि पश्चिमेकडे सरकतात.
- हे वारे जेव्हा उत्तर भारतातील थंड वारे आणि पश्चिमेकडील विक्षोभांशी टक्कर घेतात, तेव्हा मुसळधार पाऊस पडतो.
- याशिवाय जागतिक तापमानवाढीमुळे मान्सून आणि इतर हवामान प्रणाली असामान्यपणे सक्रिय होत आहेत.
- त्यामुळे सध्या मुसळधार पावसाचे प्रमाण अधिक वाढल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे.
शेतकऱ्यांसाठी नवं संकट
ऑक्टोबर हा भात, मका आणि सोयाबीनसह अनेक पिकांच्या काढणीचा महिना असतो.
- परंतु मुसळधार पावसाची शक्यता असल्यामुळे काढणी प्रक्रियेवर मोठा परिणाम होऊ शकतो.
- पिकांचे नुकसान होण्यासोबतच रोगराई वाढण्याचा धोका आहे.
- परिणामी उत्पादनात घट येऊ शकते.
- आधीच पिके पाण्याखाली गेल्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेले असताना आता त्यांना नव्या संकटाला सामोरे जावे लागणार आहे.
शहरी भागालाही फटका
हा पाऊस फक्त ग्रामीण भागापुरता मर्यादित राहणार नाही. शहरी भागातही याचा मोठा फटका बसणार आहे.
- रस्त्यांवर पाणी साचणे
- वाहतुकीत अडथळे निर्माण होणे
- पाण्यातून पसरणाऱ्या रोगराई वाढण्याचा धोका
- यामुळे ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागांना हा मुसळधार पाऊस झोडपून काढणार असल्याचे संकेत मिळत आहेत.