पत्रकारांचा विजय! ‘दीक्षा भूमी ते मंत्रालय’ यात्रेचं यश अखेर गवसलं

मुंबई | प्रतिनिधीमहाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या ‘दीक्षा भूमी ते मंत्रालय’ पत्रकार संवाद यात्रेला आज मोठे यश मिळाले असून, डिजिटल माध्यमांना शासकीय जाहिराती देण्यासाठी शासनाने अधिकृत धोरण घोषित केले आहे. ही घोषणा महाराष्ट्र शासनाने 3 जून 2025 रोजी प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकाद्वारे केली आहे.
परिपत्रक वाचण्यासाठी इथे क्लिक करा 202506031514098707
“मंत्री गुलाबराव पाटील यांचा वाढदिवस विशेष : शुभेच्छा जाहिराती पाहा”
🗂 परिपत्रक क्रमांक: भाप्र-2025/प्र.क्र.132/भापव-1
📅 दिनांक: 3 जून 2025
या परिपत्रकानुसार, डिजिटल माध्यमांनाही आता पारंपरिक वृत्तपत्रांप्रमाणेच शासकीय जाहिराती देण्यात येणार आहेत. यामुळे हजारो डिजिटल पत्रकार आणि माध्यमधारकांना आर्थिक स्थैर्य आणि न्याय मिळणार आहे.
✊ संघर्षाची पार्श्वभूमी:
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष मा. श्री. वसंत मुंडे यांच्या नेतृत्वाखाली ही पत्रकार संवाद यात्रा आयोजित करण्यात आली होती. सात हजार किलोमीटरचा प्रवास, 27 जिल्हे, 150 तालुके असा व्यापक दौरा करत विविध ठिकाणच्या पत्रकारांशी संवाद साधण्यात आला. पत्रकारांच्या अनेक मागण्या शासनदरबारी मांडण्यात आल्या. त्यातील सर्वात महत्त्वाची मागणी होती — डिजिटल मीडियाला शासकीय जाहिरातींचा हक्क.
आज ती मागणी पूर्णत्वास आली आहे. हा निर्णय म्हणजे पत्रकारांच्या एकजुटीचा, सातत्याच्या संघर्षाचा आणि लोकशक्तीच्या प्रभावाचा ठळक नमुना आहे.
पोलीस दलात मोठा फेरबदल! कोण कोठे गेले, पाहा संपूर्ण यादी बघण्यासाठी इथे क्लिक करा 👈
🌟 सर्व पत्रकार बांधवांना शुभेच्छा
या ऐतिहासिक निर्णयामुळे राज्यभरातील डिजिटल पत्रकार, यूट्यूब चॅनल्स, वेब पोर्टल्स, ऑनलाईन न्यूज मीडिया यांना अधिकृत मान्यता मिळून त्यांच्या कार्याला चालना मिळणार आहे.
🙏 शासनाचे आभार, नेतृत्वाला सलाम!
या ऐतिहासिक निर्णयाबद्दल महाराष्ट्र शासनाचे मनःपूर्वक आभार!
तसेच, हा लढा नेटाने लढणारे, पत्रकारांच्या पाठीशी ठाम उभे राहणारे मा. श्री. वसंत मुंडे यांचे विशेष अभिनंदन!
प्रविण सपकाळे
राज्य कार्याध्यक्ष
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई