श्री विश्वकर्माय पांचाळ सहाय्यक मंडळ, जळगाव मधील गैरव्यवहाराची चौकशी

जळगाव : येथील श्री विश्वकर्मा पांचाळ सहाय्यक मंडळाचे नविन अध्यक्ष व नविन कार्यकारीणी गठीत करण्यात यावी या व इतर मागण्यांसाठी सामाजिक कार्यकर्ते प्रमोद रुले यांनी शनिवार. २१ सप्टेंबरपासून बेमुदत उपोषण पुकारले आहे.प्रमोद रुले यांनी श्री विश्वकर्मा पांचाळ सहाय्यक मंडळात घराणे शाही सुरु असून मंडळाच्या हिशोबात घोळ करण्यात आला असल्याचा आरोप केला आहे. तसेच १९६४ पासून २०२४ पर्यंत या मंडळचा चेंजरिपोर्ट तयार करण्यात आला नाही. म.न.पा. बिल्डींग बांधकाम परमिशन काढण्यात आली नाही आहे. २४ लाखाचा हिशोब एकाच पानावर देण्यात आला व अध्यक्ष-सचिव-खजिनदार या हिशोबाच्या पानावर सही व मंडळाचे सहीशिक्के व ऑडिटरचे सही-शिक्के नाहीत. गेल्या मागिल १६ वर्षा पासून अध्यक्षाची निवड होत नाही आहेत. आपल्या गोरगरिब समाज बांधवांना अल्प दरामध्ये हॉल उपलब्ध झाला पाहिजे आदी मागण्यांसाठी बेमुदत उपोषणाला स्वातंत्र्य चौकातील मंडळाच्या हॉल समोर प्रारंभ केला आहे.मी श्री. प्रमोद राजेंद्र रुले, सामाजिक कार्यकर्ता (मो. नं. ८६००३०८१६१) उपरोक्त विषयांन्वये सदरील उपोषणास बसण्यामागील उद्देश हाच की, आमच्या श्री विश्वकर्माय पांचाळ सहाय्यक मंडळ, जळगाव यामध्ये झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी होऊन आज रोजी स्वयंघोषीत संबंधित मंडळ चालविणा-यांवर योग्य ती कार्यवाही होऊन माझ्या प्रमुख मागण्या मी आपल्यासमोर खालीलप्रमाणे मांडीत आहे.१९६४ २) असे असतांना आज रोजी जे स्वयंघोषित लोक आपणा स्वतःस अध्यक्ष, , सचिव म्हणून संबोधित आहेत यांची यावाचत तात्काळ चौकशी होणे गरजेचे आहे. कारण त्यांनी कुठल्याही नविन मंडळ कार्यकारिणीची नोंद आजपर्यंत दिल्याचे दिसून येते.) सदरील मंडळाची सन. १९६४ पासून ते २०२४ पावेतो मा. धर्मादाय आयुक्त सोा., जळगाव यांचे कार्यालयात एकही चेंज रिपोर्ट सादर करण्यात आलेला नाही.४) संबंधितांनी सदरील मंडळाचे ज्या जागेवर बांधकाम केलेले आहे त्याचावत माझे माहितीनुसार म.न.पा. कार्यालयाकडून बिल्डींग बांधकाम करणेबाबतच्या तसेल बांधकामाचे नकाशा वगैरेबाबतच्या परवानग्या घेतल्याचे दिसून आलेले नाही. फक्त त्यांनी आपल्या स्वतः समरी पॉवरमध्ये सदरील दोन मजली बिल्डींगचे बांधकाम उभारुन घेतलेले आहे. भविष्यात यायावत कुणी आवाज उठविला तर याला सर्वस्वी जबाबदार कोण ?५) संबंधितांनी सदरील स्वयंघोषीत कार्यकारिणी मंडळामध्ये आपल्या घरातील ५ ते ६ लोकांची सदस्य म्हणून नावे टाकून घेतलेली आहेत व याप्रमाणे मागील ४० वर्षापासून त्यांनी याठिकाणी एक प्रकारे घराणेशाहीस चालू ठेवलेली आहे. बाबावत चौकशी होणे गरजेचे आहे.५) संबंधितांनी मंडळाचे आजपर्यंत जेवढे सुध्दा ऑडीट खाजगी ऑडीटर यांचेकडून करून घेतले आहे त्याबाबत ऑडीटच्या नकल प्रिंट काढले असता त्यामध्ये ऑडीटर यांचे म्हणणेनुसार संबंधित कार्यकारिणीने एकही वेळेस प्रोसिडींग बुक मला दाखविलेले नाही.६) आजपर्यंत समाज बांधवांकडून निधी स्वरुपात अनेक वेळा निधी जमा करण्यात आलेला आहे तसेच सभासद फी म्हणून रु. १२००/- जमा केलेले आहेत, तसेच लोकप्रतिनिधी आमदार यांचेकडून सुध्दा त्यांनी वर्गणी घेतलेली आहे यानुसार एकूण रक्कम रु.२८,८२,२९१/- आजपर्यंत जमा झालेले आहे. परंतु याबाबतचा संपूर्ण रक्कमेचा हिशोब हा तोडका मोडका एकचा पानावर दाखविला असून त्यावर सुध्दा संबंधितांनी आपल्या सहाा तसेच मंडळाचे शिक्के वगैरे टाकलेले नाहीत. तसेच संबंधितांनी बँकेच्या खात्यातून वैयक्तिक रक्कमा सुध्दाकाढलेल्या आहे. यामुळे यामध्ये सुध्दा मोठा घोटाळा झाला असल्याचे माझे मत आहे. मागील २ ते २. ।। महिन्यांपुर्वी समाज बांधवांची सर्व साधारण सभा घेण्यात येऊन यामध्ये ७)संबंधितांनी सर्व हिशोब वगैरे क्लिअर करुन नविन अध्यक्ष, सचिव, खजिनदार यांची निवड करणेबाबतचे आश्वासित केले होते. परंतु एवढा कालावधी होऊन सुध्दा त्यांनी हिशोब वगैरे दाखविला नाही व आपल्या पदाचा पदभार सोडलेला नाही.८) संबंधित मंडळाचे जुनी भांडे असून ती वापरण्यासाठी आजपर्यंत संबंधितांकडून एकाही समाज बांधवांना कुठल्याच कार्यात दिली नसल्याचे मला माझे माहितीनुसार समजते.९) खरोखरच गरजू व होतकरु समाज बांधवास सुध्दा संबंधितांकडून आजपर्यंत अल्प अशा दरात कार्यक्रमासाठी बोडींग उपलब्ध करुन दिलेली नाही. त्यामुळे समाज बांधव यांचेवर खूपच नाराज आहे.तरी वरीलप्रमाणे माझ्या मागण्या असून स्वयंघोषीत अध्यक्ष, सचिव, खजिनदार यांनी आपले पदाचे राजीनामे तात्काळ द्यावेत. तसेच म. धर्मादाय आयुक्त सोो, यांचे संमतीने मतदान पध्दतीने समाजातील नविन युवा कार्यकर्त्यांना व समाज बांधवांना या जागेवर संधी दिली जात नाही तोपर्यंत माझा हा समाजासाठी लढा सुरुच राहणार आहे