रामदेववाडी अपघात प्रकरण उन्मेश पाटील संतापले, म्हणाले…

”रामदेववाडी अपघात प्रकरणांमध्ये पहिल्यापासून शिवसेना ठाकरे गट हा त्या अपघातातील मयतांच्या पाठीशी उभा आहे. ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी बाल संगोपनदिन होता. नशेमध्ये असणाऱ्या कार अपघातात महिलासह दोन लहान निष्पाप बालकांचा मृत्यू झाला आहे. २० दिवस उलटले या घटनेमध्ये कारवाई झाली नाही. पुणे येथील घटनेनंतर या प्रशासनाला जाग आली आहे. मंत्री आणि सरकारला आमचा इशारा आहे की कुठलाही दबाव या अपघात प्रकरणात आणू नये”, असं म्हणत माजी खासदार उन्मेश पाटील यांनी विरोधकांना लक्ष्य केलं आहे.
”२० दिवस झाले का कारवाई केली नाही? तो गांजा आला कुठून? असे बरेच प्रश्न पाटलांनी विरोधकांना केले आहेत. त्यांनी नशा केली तेव्हा गाडीमध्ये किती लोक होती? याबाबत सखोल चौकशी करून दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी. रामदेववाडीच्या अपघातात आमची पहिल्या दिवसापासून मागणी आहे”. ”श्रीमंत घरातील अवलादांनी नशेच्या भरात निष्पाप चार जणांचा बळी घेतला. गांजा गाडीत आढळल्याची एफआयआरची नोंद आहे. माणसांना चिरडून टाकण्याची यांच्यामध्ये हिम्मत कुठून होते? ही हिम्मत नशेमध्ये होते की सत्तेमुळे? याची चौकशीची मागणी पाटलांनी केली आहे.
”आम्ही जेव्हा त्या परिवाराच्या भेटीला गेलो तेव्हा ते म्हणाले की, ”आम्हाला कुठलाही मंत्री या ठिकाणी भेटायला आलेला नाही. जे मंत्री दवाखान्यामध्ये भेटायला आले होते ते संशयित आरोपींना वाचवण्यासाठी आले होते असं चित्र दिसत होतं”, असंही उन्मेश पाटील यांनी यावेळी सांगितलं.
नेमकं अपघात प्रकरण काय?
रामदेववाडी जवळ ७ मे रोजी भरधाव कारने नाही दुचाकीला धडक दिल्याने आईसह दोन मुले व भाचा असा चार जणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांचे चिरंजीव अखिलेश संजय पवार आणि बिल्डर अभिषेक कौल यांचा मुलगा अर्णव कौल या दोघांना २३ मे रोजी ताब्यात घेऊन जळगावत आणले. त्यांना न्यायालयात हजर केले असता २७ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.या प्रकरणात आणखी एकाचा समावेश असल्याचे यापूर्वी समोर आले होते. त्यानुसार पोलिसांनी ध्रुव सोनवणे याला अटक केल्याची माहिती तपास अधिकारी तथा उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांनी दिली.
रक्ताच्या नमुन्यांचा अद्यापही अहवाल नाही
अपघातावेळी चारचाकी वाहनामध्ये गांजा देखील सापडलेला होता. तो गांजा कारमध्ये असलेल्या तरुणांनी सेवन केला होता किंवा नाही. यासाठी अखिलेश पवार व अर्णव कौल या दोघांचे रक्ताचे नमुने घेण्यात आलेले आहे. मात्र २० दिवस उलटले असून अद्यापही रक्ताच्या नमुनांचा अहवाल प्राप्त झालेला नाही. यामध्ये राजकीय वरदहस्त असल्याने अहवाल प्राप्त होत नसल्याच्या प्रतिक्रिया मयत कुटुंबियांकडून येत आहेत.यतांच्या पाठीशी उभा आहे. ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी बाल संगोपनदिन होता. नशेमध्ये असणाऱ्या कार अपघातात महिलासह दोन लहान निष्पाप बालकांचा मृत्यू झाला आहे. २० दिवस उलटले या घटनेमध्ये कारवाई झाली नाही. पुणे येथील घटनेनंतर या प्रशासनाला जाग आली आहे. मंत्री आणि सरकारला आमचा इशारा आहे की कुठलाही दबाव या अपघात प्रकरणात आणू नये”, असं म्हणत माजी खासदार उन्मेश पाटील यांनी विरोधकांना लक्ष्य केलं आहे.
”२० दिवस झाले का कारवाई केली नाही? तो गांजा आला कुठून? असे बरेच प्रश्न पाटलांनी विरोधकांना केले आहेत. त्यांनी नशा केली तेव्हा गाडीमध्ये किती लोक होती? याबाबत सखोल चौकशी करून दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी. रामदेववाडीच्या अपघातात आमची पहिल्या दिवसापासून मागणी आहे”. ”श्रीमंत घरातील अवलादांनी नशेच्या भरात निष्पाप चार जणांचा बळी घेतला. गांजा गाडीत आढळल्याची एफआयआरची नोंद आहे. माणसांना चिरडून टाकण्याची यांच्यामध्ये हिम्मत कुठून होते? ही हिम्मत नशेमध्ये होते की सत्तेमुळे? याची चौकशीची मागणी पाटलांनी केली आहे.
”आम्ही जेव्हा त्या परिवाराच्या भेटीला गेलो तेव्हा ते म्हणाले की, ”आम्हाला कुठलाही मंत्री या ठिकाणी भेटायला आलेला नाही. जे मंत्री दवाखान्यामध्ये भेटायला आले होते ते संशयित आरोपींना वाचवण्यासाठी आले होते असं चित्र दिसत होतं”, असंही उन्मेश पाटील यांनी यावेळी सांगितलं.
नेमकं अपघात प्रकरण काय?
रामदेववाडी जवळ ७ मे रोजी भरधाव कारने नाही दुचाकीला धडक दिल्याने आईसह दोन मुले व भाचा असा चार जणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांचे चिरंजीव अखिलेश संजय पवार आणि बिल्डर अभिषेक कौल यांचा मुलगा अर्णव कौल या दोघांना २३ मे रोजी ताब्यात घेऊन जळगावत आणले. त्यांना न्यायालयात हजर केले असता २७ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.या प्रकरणात आणखी एकाचा समावेश असल्याचे यापूर्वी समोर आले होते. त्यानुसार पोलिसांनी ध्रुव सोनवणे याला अटक केल्याची माहिती तपास अधिकारी तथा उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांनी दिली.
रक्ताच्या नमुन्यांचा अद्यापही अहवाल नाही
अपघातावेळी चारचाकी वाहनामध्ये गांजा देखील सापडलेला होता. तो गांजा कारमध्ये असलेल्या तरुणांनी सेवन केला होता किंवा नाही. यासाठी अखिलेश पवार व अर्णव कौल या दोघांचे रक्ताचे नमुने घेण्यात आलेले आहे. मात्र २० दिवस उलटले असून अद्यापही रक्ताच्या नमुनांचा अहवाल प्राप्त झालेला नाही. यामध्ये राजकीय वरदहस्त असल्याने अहवाल प्राप्त होत नसल्याच्या प्रतिक्रिया मयत कुटुंबियांकडून येत आहेत.
