१३ वर्षीय तेजसचा गळा चिरून खून! – एरंडोल हादरलं!

एरंडोल (जि. जळगाव), दि. १७ जून २०२५ : एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव येथे राहणाऱ्या १३ वर्षीय तेजस गजानन महाजन या बालकाचा मृतदेह गळा चिरलेल्या अवस्थेत मंगळवारी सकाळी ८ वाजता खर्ची गावाजवळील निंबाळकर यांच्या शेतात आढळून आल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. या हत्याकांडामुळे केवळ रिंगणगाव नव्हे, तर संपूर्ण जिल्ह्यात भीतीचे आणि हळहळ व्यक्त करणारे वातावरण निर्माण झाले आहे. एरंडोल पोलीस ठाण्याचे पथक या प्रकरणाचा कसून तपास करीत आहे.
गुलाबराव पाटील भाविकांमध्ये रमले
मृत तेजस गजानन महाजन (वय १३) हा रिंगणगाव येथील रहिवासी असून आपल्या आई-वडील व मोठ्या बहिणीसोबत राहत होता. त्याचे वडील गजानन महाजन हे शेती व हार्डवेअरच्या दुकानावर मेहनत करून घर चालवतात. सोमवार, १६ जून रोजी गजानन महाजन यांनी मुलगा तेजसला दुकानावर बसवले व ते काही कामासाठी जळगावला गेले होते. तेजसने संध्याकाळी दुकान बंद करून घरी यावे, अशी अपेक्षा होती. मात्र रात्री उशीर होईपर्यंत तेजस घरी न पोहचल्याने कुटुंबीय घाबरले.
गुलाबराव पाटील साहेबांच्या संकल्पनेतून २१०० वारकऱ्यांसह पंढरपूरकडे
त्याच दिवशी गावात आठवडी बाजार असल्याने अनेकजण ये-जा करत होते. घरच्यांनी आणि नातेवाईकांनी रात्रीपर्यंत गावभर तसेच परिसरात शोध घेतला, मात्र तेजसचा कुठेही थांगपत्ता लागला नाही. अखेर रात्री उशिरा एरंडोल पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली.
पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली रात्रभर पोलीस पथकाने शोधमोहीम राबवली. मंगळवार, १७ जून रोजी सकाळी सुमारास खर्ची गावाजवळील निंबाळकर यांच्या शेतात काही ग्रामस्थांना एक मृतदेह आढळून आला. त्यांनी याची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. शवाची तपासणी केली असता, तो मृतदेह तेजस महाजन याचाच असल्याचे स्पष्ट झाले. मृतदेहाच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून खून झाल्याचे निदर्शनास आले.
दरोडेखोरांचा थरार! पोलिसांचा इनोव्हा कारचा जीवघेणा पाठलाग
घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली. मृतदेह पाहून कुटुंबीयांनी हंबरडा फोडला. पोलिसांनी घटनास्थळी मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन मागवून पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली आहे. पोलिसांकडून या खुनामागचे नेमके कारण काय हे शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे. काही इसमांना संशयित म्हणून ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार ही पूर्वनियोजित हत्या असण्याची शक्यता असून, बालकाचा खून कुणी व का केला, यामागे कोणते वैयक्तिक कारण, वाद, सूडभावना किंवा इतर कोणती गोष्ट आहे का, याचा तपास सखोलपणे सुरू आहे. पोलीस विविध अंगांनी तपास करत आहेत.
ही घटना बालकांबाबत होणाऱ्या गुन्ह्यांची गंभीरता अधोरेखित करत असून, जिल्हा प्रशासन, पोलीस दल आणि नागरिकांमध्ये संतापाचे व दुःखाचे वातावरण आहे. बालकावर अत्यंत अमानुष हल्ला करून त्याचा जीव घेण्यात आला असल्याने या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे.