बाळू महाराज यांनी आपल्या कीर्तनात संतांच्या महत्त्वावर विशेष प्रकाश टाकला. ते म्हणाले, “संत कधीच स्वार्थ बघत नाहीत. तेच खरे संत थोर. देवापेक्षा संत मोठे आहेत, कारण संतांमुळेच देवाची अनुभूती घडते.”
त्यांनी संत तुकाराम महाराजांच्या अभंगांचा आधार घेत “तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता” यासारख्या अभंगांद्वारे भक्तीचा प्रभाव आणि नातेसंबंधांतील आध्यात्मिक सौंदर्य अत्यंत प्रभावीपणे उलगडलं.

भाविक आणि मंत्रीमहोदय चिंब अवस्थेत तल्लीन

कीर्तनाच्या वेळी पावसाने तब्बल तीन वेळा हजेरी लावली. मात्र, हा भक्तीरसाचा अमृतस्नान थांबवण्याऐवजी भाविक व पालकमंत्री पाटील यांना आणखी भावनिकरित्या जोडून गेला. भिजलेले कपडे, डोक्यावर ओले केस आणि डोळ्यांत श्रद्धेचे अश्रू – हा भक्तीचा नजारा उपस्थित प्रत्येकासाठी अविस्मरणीय ठरला.

बाळू महाराज म्हणाले, “हा केवळ भक्तीचा अनुभव नव्हे, तर एक आंतरिक साधनेचा परिपाक आहे. या पावसात चिंब होणं म्हणजे प्रत्यक्ष ईश्वरी कृपेचं दर्शन आहे.”

संपूर्ण गाव भाविकतेच्या रंगात रंगले

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या अखंड हरिनाम सप्ताहात ह.भ.प. गजानन महाराज वरसाडेकर आणि ज्ञानेश्वर महाराज पाळधीकर यांचीही उपस्थिती लाभली. कार्यक्रमाच्या सुरुवातीस पालकमंत्र्यांच्या हस्ते बाळू महाराजांचा सन्मान करण्यात आला.

नियोजनाचे सर्वत्र कौतुक

या संपूर्ण कार्यक्रमाचे सुयोग्य नियोजन जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, विक्रम पाटील, जी.पी.एस. मित्रपरिवार व शिवसेना-युवासेना परिवार यांनी संयुक्तपणे केले. कार्यक्रमातील शिस्त, वेळेचे नियोजन, आणि सर्व व्यवस्थापन यामुळे आयोजनकर्त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

पाळधी गावात भक्ती, एकात्मता आणि परंपरेचे दर्शन

या सप्ताहाच्या निमित्ताने पाळधी गावाने आपली धार्मिक व आध्यात्मिक समृद्धी दाखवली आहे. गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, “असा अनुभव यापूर्वी कधीही आला नव्हता.” संपूर्ण गाव एकसंधपणे सहभागी झाला आणि भक्तीपरंपरेचा भव्य सोहळा साजरा केला.

या सप्ताहाचे हे स्मरणीय क्षण गावकऱ्यांच्या, भाविकांच्या आणि उपस्थित प्रत्येकाच्या हृदयात कायमचे कोरले गेले, हे निश्चित.

Back to top button
error: Content is protected !!