डांभुर्णी हादरलं! बिबट्याची शिकार अखेर संपली!

..अखेर बिबट्या झाला जेरबंद…!!
– दोन वर्षांच्या चिमुरडीला मृत्युमुखी केल्यानंतर वनविभागाची यशस्वी कारवाई
जळगाव, दि. १८ – यावल तालुक्यातील डांभुर्णी शिवारात दोन वर्षांच्या चिमुरडीचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यानंतर अखेर वनविभागाच्या तातडीच्या आणि कसोशीच्या प्रयत्नातून बिबट्याला जेरबंद करण्यात यश आले आहे. ही घटना संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण करणारी होती.
घटनाक्रम
दि. १७ एप्रिल २०२५ रोजी मध्यरात्री १२.३० ते १.०० वाजेच्या सुमारास प्रभाकर चौधरी यांच्या मा.ग.क्र. ७४१ मधील शेतात झोपलेल्या रत्ना सतीश ठेलारी (वय २ वर्षे) हिला बिबट्याने झडप घालत शेतातील केळीच्या बागेत ओढत नेले आणि तीथेच तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही मागील महिन्यातील अशा प्रकारची दुसरी घटना असल्यामुळे शेतकरी, मजूर आणि स्थानिक ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
👉हवालदार झाले देवदूत सविस्तर माहिती बघण्यासाठी इथे क्लिक करा👈
तातडीची कारवाई
ही घटना समजताच उपवनसंरक्षक श्री. जमीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक (प्रादेशिक व कॅम्पा) श्री. समाधान पाटील यांच्या नेतृत्वात तातडीने कारवाई सुरू करण्यात आली. वनपरिक्षेत्र अधिकारी यावल पश्चिम श्री. सुनील भिलावे, यावल पूर्वचे श्री. स्वप्निल फटांगरे, तसेच इतर अधिकारी व कर्मचारी यांनी मिळून सदर परिसरात कडक बंदोबस्त ठेवला.
बिबट्याला जेरबंद करण्यासाठी नियोजन
संपूर्ण परिसरात चार ठिकाणी पिंजरे लावण्यात आले होते. मानद वन्यजीव रक्षक श्री. रविंद्र फाळक, श्री. अमन गुजर यांच्या सहकार्याने डॉ. यश सागर (पशुवैद्यकीय अधिकारी, TTC जळगाव) व अनुभवी शूटर वनपाल गणेश गवळी यांना पिंजऱ्याजवळ तैनात करण्यात आले.
यशस्वी शिकार
१७ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता बिबट्या पिंजऱ्याजवळ आल्याचे निदर्शनास येताच वनपाल गणेश गवळी यांनी अत्यंत अचूक निशाणा साधत बेशुद्धीकरणासाठी लागणारे इंजेक्शन त्याला टोचले. Thermal Drone च्या सहाय्याने शोध घेण्यात आला असता बिबट्या काही अंतरावर गवतात बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. त्यानंतर वनविभागाच्या पथकाने त्याला सुरक्षितरित्या जेरबंद केले.
पुढील कार्यवाही
सध्या बिबट्याची वैद्यकीय तपासणी करण्यात येत असून, त्यानंतर पुढील उपचारासाठी आणि निरीक्षणासाठी त्याला नागपूर येथील वन्यजीव रुग्णालयात पाठवण्यात येणार आहे.
सहकार्याचे आवाहन
“अशा घटनांमध्ये नागरिकांनी घाबरून न जाता वनविभागास सहकार्य करावे. वेळेवर माहिती आणि सहकार्यामुळेच अशा कारवाया यशस्वी होतात,” असे आवाहन सहाय्यक वनसंरक्षक श्री. समाधान पाटील यांनी केले आहे.