बातम्या

हवालदार झाले देवदूत – अजिंठा चौफुली येथे थरारक प्रसंगात जीव वाचवला!

जळगाव – 17 एप्रिल 2025, सकाळी 9 वाजता जळगाव शहरातील अजिंठा चौफुली येथे सकाळी 9 वाजेच्या सुमारास एक थरारक घटना घडली, जिथे वाहतूक शाखेचे हवालदार श्री. गुणवंत देशमुख आणि श्री. विठ्ठल मुंडे यांनी प्रसंगावधान आणि धाडस दाखवत एका दुचाकीस्वाराचा जीव वाचवला.

सदर दुचाकीस्वार चुकून डंपरच्या पुढच्या डाव्या चाकामध्ये अडकला होता. काही क्षणात मोठा अपघात होण्याची शक्यता होती. पण हवालदार देशमुख आणि मुंडे यांनी प्रसंगावधान राखत त्या तरुणाला तात्काळ डंपरच्या चाकाखालून सुरक्षितपणे बाहेर ओढले, आणि त्याचा जीव वाचवला.

या घटनेत तो दुचाकीस्वार थोडक्यात बचावला असून त्याला कोणतीही मोठी इजा झाली नाही, हे सुदैव म्हणावे लागेल. घटनास्थळावर उपस्थित नागरिकांनीही या दोघी हवालदारांच्या तात्काळ कृतीचे आणि माणुसकीने ओतप्रोत भरलेल्या धाडसाचे मनापासून कौतुक केले.

“हवालदार हे केवळ कायदा पाळवणारे अधिकारी नाहीत, तर गरज पडल्यास देवदूतही ठरतात”, असं अनेकांनी भावनिक प्रतिक्रिया देत म्हटलं.

या दोघी हवालदारांच्या कार्याची दखल घेत, जळगाव पोलीस अधीक्षकांनी त्यांचा जाहीर सत्कार करावा, करण जीव वाचवणाऱ्या पोलिसांचा सन्मान होणं ही काळाची गरज आहे. अशा कर्मचाऱ्यांचं मनोबल वाढवण्यासाठी आणि पोलिस दलाबद्दल समाजामध्ये सकारात्मकता निर्माण करण्यासाठी, अशा उदाहरणांचा गौरव होणे आवश्यक आहे.

सदर घटनेचा एक फोटोही समोर आला आहे, ज्यामध्ये डंपरच्या पुढच्या डाव्या चाकाजवळ ती दुचाकी अडकलेली दिसत आहे – आणि पोलिसांनी केलेली मदत स्पष्टपणे दिसून येते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!