बातम्या

उदय सामंत यांच्या वक्तव्यामुळे राज्यात राजकीय भूकंपाची शक्यता?

राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडवणारे वक्तव्य राज्याचे उद्योगमंत्री आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील महत्त्वाचे नेते उदय सामंत यांनी केलं आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत अनेक आमदार अस्वस्थ असल्याचा दावा त्यांनी केला असून, हे सर्व अस्वस्थ आमदार आजही एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याचे उदय सामंत यांनी म्हटलं आहे.

 

त्यांनी स्पष्ट केलं की, यापूर्वी त्यांनी जसे पाच आमदारांच्या नावाचा उल्लेख केला होता आणि ते नंतर शिंदे गटात सहभागी झाले, तसेच आता आणखी सहा आमदार वेटिंगमध्ये आहेत. त्यामुळे राज्यात राजकीय भूकंप होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात चर्चिली जात आहे.

यावरून शिवसेनेत (उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात) खदखद सुरू असल्याची चर्चा रंगली आहे. मात्र, या वक्तव्यानंतर उद्धव ठाकरे गटाकडून जोरदार प्रतिक्रिया देण्यात आली आहे.

महिलांना मिळणार दरमहा 2500 रुपये 

सचिन अहिरांचा पलटवार

उदय सामंत यांच्या दाव्याला उत्तर देताना, उद्धव ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांनी उदय सामंत यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे. “उदय सामंत यांनी आधी स्वतःच्या खात्याकडे पाहावं, नंतर आमच्यावर बोलावं,” असा टोला त्यांनी लगावला.

सचिन अहिर पुढे म्हणाले, “उद्योजकता मंत्रालयाचा कारभार पाहणाऱ्या उदय सामंत यांनी स्वतःच एक मोठं पत्र लिहून आपल्याकडे दुर्लक्ष होतंय, आपल्याला न विचारता बैठक घेतल्या जातात, अशी तक्रार केली होती. त्यामुळे आधी त्यांनी स्वतःच्या खात्यातील अस्वस्थता दूर करावी आणि मग इतरांवर टीका करावी.”

मोठा घोटाळा उघड ? इथेच क्लिक करा सविस्तर माहितीसाठी

राजकीय अर्थ

उदय सामंत यांच्या या वक्तव्यामुळे शिवसेनेतील (उद्धव गटातील) संभाव्य नाराज आमदारांचे भवितव्य, तसेच त्यांचा पुढील निर्णय काय असेल, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. दुसरीकडे, उद्धव ठाकरे गटानेही लगेच प्रत्युत्तर देत हे आरोप फेटाळून लावले आहेत, त्यामुळे यापुढे राजकीय घडामोडींना वेग येण्याची शक्यता आहे.

एकूणच, उदय सामंत यांच्या या विधानामुळे राज्यात पुन्हा एकदा राजकीय तापमान वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!