देशातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री किसान सन्मान योजना राबवण्यात येते. या योजनेसंदर्भात एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. जे शेतकरी या योजनेशी अद्याप जोडले गेले नाहीत, त्यांना या योजनेचा लाभ घेण्याची संधी मिळणार आहे.

15 एप्रिलपासून नवीन मोहीम सुरू!

केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी लोकसभेत दिलेल्या माहितीनुसार PM किसान सन्मान निधी अंतर्गत सर्व पात्र शेतकऱ्यांना 6000 रुपयांचा वार्षिक लाभ मिळतो. मात्र, काही शेतकरी अद्याप या योजनेशी जोडले गेलेले नाहीत. अशा शेतकऱ्यांना संधी देण्यासाठी केंद्र सरकार विशेष मोहीम राबवत आहे.

या योजनेत सहभागी होण्यासाठी तीन मोहिमा राबवण्यात आल्या आहेत आणि चौथी मोहीम 15 एप्रिलपासून सुरू होणार आहे. राज्य सरकारांनीही या मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा आणि पात्र शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळवून द्यावा, असे कृषी मंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.

मागील थकबाकीची रक्कमही मिळणार!

सरकारकडून अद्याप नोंदणी न झालेल्या शेतकऱ्यांना मागील थकबाकीची रक्कम देण्यात येणार आहे. त्यामुळे अद्याप नोंदणी न झालेल्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर अर्ज करावा.

PM Kisan पोर्टल आणि मोबाईल अॅपची सुविधा

शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी PM Kisan पोर्टल आणि मोबाईल अॅप सुरू करण्यात आले आहे. या माध्यमातून शेतकरी सहज नोंदणी करू शकतात आणि त्यांच्या खात्यात थेट पैसे जमा होतील.

लाभाची रक्कम का थांबते?

अनेक शेतकरी PM किसान सन्मान निधी योजनेत नोंदणीकृत आहेत, तरीही त्यांच्या खात्यात पैसे पोहोचत नाहीत. याची अनेक कारणे असू शकतात, जसे की –
✅ ई-केवायसी पूर्ण नाही
✅ शेतजमिनीची पडताळणी बाकी आहे
✅ अर्जातील काही चूक आहे

20वा हप्ता लवकरच!

या योजनेअंतर्गत आतापर्यंत 19 हप्ते जारी करण्यात आले आहेत. आता शेतकरी 20व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी अद्याप प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, त्यांनी लवकरात लवकर PM Kisan पोर्टल किंवा CSC सेंटरला भेट देऊन नोंदणी करावी

Back to top button
error: Content is protected !!