ग्रामस्थांनी समस्या मांडताच पालकमंत्री तत्काळ ॲक्शन मोडवर !

पाळधी ता. धरणगाव (प्रतिनिधी) पाळधीकडून साधारण २५ ते ३० गावांना जोडणाऱ्या रस्त्यावर मुसळधार पावसामुळे खड्डे पडले होते. याबाबत पथराड, शेरीसह इतर ग्रामस्थांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे समस्या मांडली. त्यावर पालकमंत्री तात्काळ अॅक्शन मोडवर आले आणि यंत्रणा कामाला लावत रस्त्यावर मुरूम टाकण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु केले आहे.
पाळधी रेल्वे गेटकडून सोनवद, झुरखेडे,शेरी, पथराडसह साधारण २५ ते ३० गावांना जोडणाऱ्या रस्त्यावर मुसळधार पावसामुळे खड्डे पडले होते. यामुळे वाहन धारकांना मोठी कसरत करून आपली वाहने काढावी लागत होती. याबाबत याबाबत पथराड, शेरीसह इतर ग्रामस्थांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे काल सायंकाळी समस्या मांडली होती. त्यावर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी यंत्रणा कामाला लावली. रस्त्यावर मुरूम टाकण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु झाले असून सायंकाळपर्यंत खड्डे बुजविण्याचे काम पूर्णत्वास येणार आहे. दरम्यान, ग्रामस्थांनी समस्या मांडताच पालकमंत्री तात्काळ अॅक्शन मोडवर येत समस्या तात्काळ मार्गी लावल्यामुळे ग्रामस्थांनी पालकमंत्र्यांचे आभार मानले आहेत.