राजकारण

जळगाव जिल्ह्याला पाचवा मंत्री मिळणार ?

महायुती सरकारचा रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होणार असून तशा हालचाली देखील सुरु झाल्या आहेत. लोकसभा निवडणुकीत महायुतीला फटका बसल्यानंतर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करुन अनेकांना खूश करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. चोपडा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार लता चंद्रकांत सोनवणे यांचे नाव जिल्ह्यातून आघाडीवर असून पारोळ्याचे आमदार चिमणराव पाटीलही फिल्डिंग लावून आहेत. राज्य मंत्रिमंडळात नंबर लागला तर जळगावला मंत्र्यांचा जिल्हा म्हणून संबोधले जाणार आहे. श्रीमती सोनवणे किंवा श्री. पाटील या पैकी कुणाचाही नंबर लागला तर जिल्ह्याला पाचवा मंत्री मिळणार आहे.



महाविकास आघाडीचे सरकार उलथवून शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आले मात्र या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होण्यास मुहुर्त सापडत नव्हता. आता विधानसभा निवडणुका तोंडावर असून काही नाराज आमदारांची नाराजी दूर करुन त्यांना खूश करण्याचा प्रयत्न शिंदे-फडणवीसांकडून होणार आहे. तर ज्या मतदारसंघात महायुतीची ताकद जास्त आहे तेथे मंत्रीपद देण्यावर भर आहे. अवघ्या चार महिन्यावर विधानसभेचा बिगुल वाजणार असला तरी मंत्रिमंडळ विस्तार करण्यावर महायुतीचे एकमत झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!