त्यांनी स्पष्टपणे सांगितले की यापूर्वी नागरिकांना छोट्या-छोट्या कामांसाठी तालुक्याच्या ठिकाणी जावे लागत असे, मात्र आता गावपातळीवरच शासकीय योजना उपलब्ध करून देण्याचे काम हाती घेतले आहे. “महायुती सरकार ‘अंत्योदय’ या विचाराने कार्य करत असून सर्वसामान्य व शेवटच्या घटकापर्यंत योजनांचा लाभ पोहोचवण्यावर भर देत आहे,” असेही आमदार जावळे यांनी नमूद केले.

प्रांताधिकारी बबनराव काकडे आणि तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांच्या कार्याची त्यांनी प्रशंसा करत त्यांचे प्रशासनिक योगदान उल्लेखनीय असल्याचे सांगितले.

भीषण अपघातात प्रवासी जखमी!

शिबिरात विविध योजनांची माहिती व लाभ वाटप

  • तहसीलदार श्रीमती मोहनमाला नाझीरकर यांनी शेती रस्ते, फार्मर आयडी, पीएम किसान योजना व शैक्षणिक दाखले याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
  • उपविभागीय अधिकारी बबनराव काकडे यांनी विद्यार्थ्यांना तत्काळ शैक्षणिक दाखले मिळवण्यासाठीची प्रक्रिया समजावून सांगितली.
  • आदिवासी प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांनी आदिवासी विद्यार्थ्यांसाठी कॅम्प आयोजित करून जाती आणि उत्पन्न दाखले मोफत वितरित केल्याची माहिती दिली. तसेच आमदार अमोलदादांच्या प्रयत्नातून आदिवासी वसतिगृहाचे बांधकाम पूर्ण झाले असल्याचेही त्यांनी सांगितले.
  • लाभार्थ्यांना मंजुरी पत्र आणि वृक्ष वाटप
  • संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या लाभार्थ्यांना मंजुरी पत्र आणि एक वृक्ष वितरित करण्यात आला.
  • गावातील रेशन कार्डमध्ये नाव समाविष्ट करण्यासाठी एकूण १४७ अर्ज प्राप्त झाले आहेत.

भरधाव वाहनाखाली तहसीलचा कर्मचारी

घरकुल योजनेसंदर्भात इशारा

आमदार जावळे यांनी ग्रामीण भागातील गरीब लाभार्थ्यांसाठी सुरू असलेल्या घरकुल योजनेत कोणतीही विलंब अथवा पैशांची मागणी झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही दिला.

याच मुद्द्यावरून त्यांनी पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला असता, अधिकारी गोंधळून गेले व गट विकास अधिकारी कार्यक्रमातून निघून गेले, ही बाब गावकऱ्यांमध्ये चर्चेचा विषय ठरली आहे.

खडसे VS महाजन | संपत्ती, जेल, घोटाळे – खळबळजनक आरोपांची मालिका!

कार्यक्रमाला मान्यवरांची उपस्थिती

कार्यक्रमाला बालविकास अधिकारी श्रीमती अर्चना आटोळे, गटविकास अधिकारी मंजूषा गायकवाड, नायब तहसीलदार विनंते, मनोज खारे, माजी जिल्हा परिषद सदस्य हर्षल पाटील, माजी जिल्हा बँक संचालक प्रशांत चौधरी, आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका, मदतनीस, सरपंच नवाज तडवी, उपसरपंच योगेश पाटील, सदस्य दिलीप तायडे, कल्पना राणे, तलाठी गजानन पाटील, कोतवाल विजय आढाळे, ग्रामसेवक बगडे, पोस्ट ऑफिस कर्मचारी अनिल सोनवणे, कृषी अधिकारी, डॉक्टर, नर्स, सामाजिक कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी तलाठी गजानन पाटील व कोतवाल विजय आढाळे यांनी विशेष परिश्रम घेतले.

अकरावी प्रवेशासाठी १० हजारांची लाच मागितली

Back to top button
error: Content is protected !!